पावसाचं नातं
मानवी मनाशी जुळलेलं आहे.
पाऊस तसाही मला
भावतो;
तो तनालाच नाही
तर मनालाही
भिजवतो.
भिजलेल्या
तनमनाला
मोहरुन
टाकण्याची
अफाट ताकद आहे
पावसात;
पण तो चिंबपणा
पेलवता यायला हवा...
नाहीतर मग
पुन्हा
“ये रे माझ्या मागल्या...”
प्रत्येकवेळी
पावसात
वेगळा पाऊस
शोधण्याची
शोधक प्रवृत्ती
तुमच्यात हवी
नाहीतर पाऊस
म्हटलं कीं;
वेंगाडणारी
तोंडंच तुम्हाला दिसतील;
चिडचिड होते इथपासून
गारव्यापर्यंत
कारणं ऐकायलाही मिळतील.
पाऊस कधी कधी
खूप गडबडीने
येतो
पटकन कोसळून
घेतो,
आला आला
म्हणेस्तोवर
पळून गेलेला
असतो;
उगीच “गनिमी काव्याचा”
फील देऊन जातो.
तर कधी कधी
तो खूप वातावरण
निर्मिती
करत बसतो
वारा सुटतो
धुरळा उडवतो
वाऱ्याला आवाज
देतो,
मस्त आभाळ
जमवायला सुरुवात करतो,
ढगांची दाटी
झालेली असते;
मग कधीतरी दोन
तीन तासांनी
पावसाला सुरुवात
तोही मन लावून
पडेल याची शाश्वती नाही.
कोसळला तर
मनसोक्त नाहीतर
लाजऱ्या नवरीसारखा
सडा शिंपून जाणार...
आम्ही लहान
असतानाही पाऊस यायचा
सकाळची सुरुवातच
असायची
दाटून आलेलं
कुंद वातावरण
हवेत मस्त
टोचणारा गारवा
मनात भिजयची
हौस;
पण आईवडिलांची
सक्त ऑर्डर
पावसात भिजायचं
नाही;
बघताबघता
पावसाला सुरुवात.
हा पाऊस मात्र
मस्त रमलेला
असायचा
चार पाच दिवस
मुक्कामालाच
असायचा मग तो.
त्याकाळी त्याला
"झड
लागली"
म्हणायचे.
आता तेवढं भरुन
येणारं
ना आभाळ राहिलं
ना ढग राहिले
नाही ना सहन
करणारी माणसं राहिली.
पाऊस दोन तीन
दिवस रोज तासभर
पडून गेला तरी
माणसं
कदरून जातात;
सहज बोलतात
पाऊस तर काहीच
सुधरु देईना.
माणसं नाजूक
झाली की
रडी
अनाकलनीय.
कधी कधी तो वाजत
गाजत येतो
साग्रसंगीत
ढगांचा गडगडाट
विजांचा कडकडाट
सोसाट्याच्या
वाऱ्याच्या
गर्जनेसह
टपोऱ्या थेंबाने
अक्षरशः
सगळयांना झोडपू
पाहतो,
उगीच रागावलेला
फील देऊन जातो.
इतका वेग असतो
कोसळण्याचा की
जिकडेतिकडे
पाणीच पाणी.
रस्ता भरुन
पाण्याचे लोट
वाहायला लागतात;
नद्या नाले भरुन
जातात
बघता बघता पूर
स्थिती निर्माण होते.
आपण माणूस
पावसापुढे किती
कस्पटासम आहे
याची प्रचिती
येते.
अशी कितीतरी
रुपं आहेत पावसाची;
हसरी
नाचरी
भिजरी
आठवणींची रेलचेल
असणारी
चिंब चिंब
झालेली तने मने
तुम्हाला भेटतील
की नाही कसं सांगावं
पण शोधायचा
प्रयत्न तर करुन पहा...
आणि नाहीच जमलं
तर सर्वांना
भावणारा प्रकार म्हणजे
पाऊस पडत असताना
गरमागरम “वडापाव;भजी”
सोबतीला वाफाळणारी कॉफ़ी
कधीतरी बेत जमवा.
सोबतीला
बॅकग्राउंडला
“केतकीच्या बनी
तिथे नाचला गं मोर”
नाहीतर
“भेट तुझी माझी
स्मरते
अजुन त्या
दिसाची
धुंद वादळाची
होती
रात्र पावसाची...”
नाहीतर
“नभं उतरू आलं,
चिंब थरथर वलं
अंग झिम्माड
झालं
हिरव्या
बहरात...”
आणि हो
“पावसाळ्यात
वडा-पाव नाही खाल्ला
तर पाप लागतं
म्हणे...” 😜
@जीवनयात्री
_
दत्तात्रय उदारे.

खुपच अप्रतिप व मनाला भावणारे लेखन .
उत्तर द्याहटवाThanks Chaitanya...
हटवादिल से दिल तक
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रे मित्रा👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद...
हटवा