मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

पेर्ते व्हा...


 आयुष्य जगायला आजही आपण अपुरे पडतोच...फरक एवढाच आहे की काहींना ते कळतं तर काहींना नाही.

उगवलेला दिवस असाही मावळणार आहे आणि तसाही मावळणारच आहे;मग तो आनंदात मावळलेला काय वाईट. 24x7 आयुष्यात कोळसा घेऊन बसलं तर कसं चालेल,कधी तरी कपडा घेऊन बसायला हवं सगळंच कधीतरी साफ करायलाच हवं...

सफाई सफाईदारपणे पार पडायला हवी,नाहीतर ती तशीच राहिली तरी चालते.

जीवनाच्या वाटा कधीतरी चाकोरीबाहेर जाऊनही जगायला हव्यात. सतत रडणारी मुलं घरात नकोशी होतात तसंच माणसाचंही आहे. 

मानो तो मौज हैवरनासमस्या तो रोज है...!!! 

जीवनाच्या मुळाशी समस्यांची पोतडी दडलेली असतेच; ती तशीच दडवून ठेवावी लागते आणि चेहऱ्यावर इस्त्री फिरवल्यासारखी सुरकुतीही नाहीशी करावी लागते.

 

जीवनात आनंद पेरावा लागतो तो आपोआप निर्माण होत नसतो. त्यासाठी माणूस म्हणून मातीशी नाळ जोडून ठेवावी लागते. प्रसंगांना साजेशी परिस्थिती निर्माण करावी लागते. आनंद वाटायला कष्ट लागतात दुःखाचं तसं नाही ते आपोआप पसरत जातं. जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी कष्ट लागतात दुःख तर जन्मजात आपल्या सोबतच आलेलं असतं. त्या दुःखाच्या जाणिवेपायी जन्मलेला जीवही जन्मसोबत रडू घेऊन येतो आणि आपणही सगळीकडे आनंद न पेरता दुःख पेरीत बसतो.

 

#पेर्ते व्हा

#तू चाल पुढं...

©दत्तात्रय उदारे.

Dattatraya Udare DM

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा