आपल्या नजरेतून आपण दुनियेला पाहतो
आणि
सगळा गुंता वाढीला लागतो.
असेल मनाचा गोंधळ पण तो कुठेतरी
थांबवताही आला पाहीजे;नाहीतर होत्याचं
नव्हतं व्हायला वेळ लागत नाही.
समोरच्याला सावरायचं असेल तर काही गोष्टी
वेळेत आवरता आल्या पाहीजेत
नाहीतर
बरेचदा वेळ निघून जाते आणि आपण
जागे होतो मग अशावेळी आपल्या हाती
काहीच लागत नाही.
मनाचा खेळ मनानेच
थांबवावा हे योग्य.....
हा कसला करतेस खेळ
नाही कुणाला कुणाचा मेळ
बघ आणि काढ जरा वेळ
नाहीतर होईल आयुष्याची भेळ.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा