सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१९

आठवणींचं ओझं...


आठवणींचं ओझं...


                      सूर्य मावळतो मावळताना तो खूप मनमोहक भासतो पण तुझ्याइतका नाही. नजरेत सौंदर्य भरतं ते "ती" चं तिच्यापेक्षा काही सुंदर  असू शकतं हा विचारसुद्धा मनाला शिवत नाही. अशी जादू असते ती... त्या प्रेयसीची. अप्सरा जरी समोर उभी राहीली तरी तिचं सौंदर्य फिकं पाडण्याची ताकद असते ती "तिच्यात".

              एका नजरेसाठी  जीवाची होणारी घालमेल शब्दांत सांगून कळत नसते. त्यासाठी प्रेमाची जादू अनुभवावी लागते. कारण प्रेम ही वर्णनाची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. फक्त त्या प्रेमात वासना नसावी. प्रेम मिळवण्याची इच्छा असावी पण ती लालसा नसावी. निर्व्याज प्रेमाचे क्षण अनुभवले तर ते कळतात नाहीतर आजकाल पाहतो तसे प्रकार घडतात.

                        आपल्या माणसाला सुखात पाहणं हेसुद्धा प्रेम असतं हे आजच्या पिढीला कसं कळणार; कारण आजची पिढी पूर्णपणे भोगवादी आहे. त्यागात प्रेम असू शकतं हा विचार रुजायला हवा.; तो रुजतोही पण तेवढी विचारांची उंची असायला हवी.

                         बघण्यात मिळणारा आनंद हा प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा कितीतरी मोठा असतो. अचानक झालेली नजरानजर किती सुखावून जाते हे शब्दात नाही हो सांगता येणार....



    

                                             _श्री.दत्तात्रय उदारे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा