सोमवार, २५ मार्च, २०१९

 

 

 

 

 

माझं असणं ,माझं नसणं मला माझ्यापुरतं ठेवायला आवडतं.

सहजी माझ्या अंतरंगात मी कुणालाही प्रवेश देत नाही.

तो भाग मी कायमच अबाधित ठेवलेला असतो. 

प्रत्येकाचंच भावविश्व वेगवेगळं असतं,

दिसायला काहीही दिसो पण 

मनाची घालमेल प्रत्येकवेळी ओठावर आणता येत नसते.

या भावना ज्याच्या त्यानं समजून घ्यायच्या असतात. 

समजण्याची पातळी मात्र आपल्याला समजायला हवी

 नाहीतर अर्थाचा अनर्थ म्हणा 

की

रंगाचा बेरंग म्हणा 

पण व्हायला वेळ लागत नाही. 

जुळलेल्या तारा असतील तरच सुराला लय सापडते. 

सगळ्याच गोष्टी काही जगाला दाखवता येत नाहीत. 

जगापुढे केविलवाणं असणं म्हणजे आपलं हसू करून घेण्यासारखं असतं. 

आणि 

हे मात्र जो तो आपापल्या परीने टाळत असतो......

 

 

 

 

                                                                  _दत्तात्रय उदारे.

 

 



1 टिप्पणी: